Wednesday, February 11, 2009

Little(?) Champs....



गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेलं 'सारेगमप Little Champs' चं पर्व अखेर ८ फेब्रुवारीला संपलं. Little Record Maker कार्तिकी गायकवाड 'महाराष्ट्राचा उद्याचा आवाज' ठरली. सारेगमप या कार्यक्रमाचं मला वाटतं हे सगळ्यात वेगळं आणि सगळ्यात लोकप्रिय पर्व असावं. असावं कशाला? होतंच.

या Little Champs नी महाराष्ट्राला किंवा देशालाच नाही तर सगळ्या जगाला आपला लळा लावला होता. कोण कुठली ती मुग्धा, कार्तिकी किंवा आर्या आणि कोण कुठले ते प्रथमेश आणि रोहित पण ते प्रत्येकाला आपल्याच घरातले वाटत होते. घराघरातून ' ए तुझा support कुणाला आहे?' किंवा 'मला आजकाल ती आर्या आवडायला लागलेय' असे संवाद ऎकू येत होते. India ला फोन केल्यावर सुद्धा इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर 'मग काय यावेळचा एपिसोड बघितला की नाही?' अशीच चर्चा व्ह्यायची. ज्यांना तो कार्यक्रम live बघायला मिळायचा नाही ते लोकं youtube वर video upload व्हायची वेडयासारखी वाट बघत रहायचे.

या कार्यक्रमात त्याचे असे बारिकसारीक दोष नक्की होते, तसं बघायला गेलं तर दोष कुठल्या कार्यक्रमात नसतात?...पण या सगळ्याच्या पलिकडे जाऊन विचार करायचा झाला तर या कार्यक्रमाने फक्त little champs नाच नाही तर आपल्यालाही खूप काही दिलं....विस्मृतीत गेलेली जुनी जुनी अतिशय उत्तम अशी मराठी गाणी या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांना ऐकायला मिळाली, आजची नवीन पिढी काय कमाल....... आहे ते लोकांना कळलं. आज आजी आणि नात या कार्यक्रमामुळे एकत्र बसून TV बघायला लागल्या. Lyrics लिहिलेला कागद समोर न ठेवता कितीही कठीण कठीण गाणी म्हणता येतात हे लोकांना पटलं.

पूर्वी TV वर रामायण-महाभारत या अशा मालिका होत्या की त्या शक्यतो कुणीही चुकवत नसे. सारेगमप चं ही तसंच झालं होतं. सर्वसामान्य लोकच नाही तर अनेक celebrities सुद्धा हा कार्यक्रम आवर्जून वेळात वेळ काढून बघत असत. Zee ने या कार्यक्रमाद्वारे मुलांचं फक्त गाणंच फूलवलं नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास केला. कधीही स्वप्नातसुद्धा ज्यांची भेट कठीण वाटावी अशा लता-ह्रदयनाथ-आशा-उषा , किशोरी आमोणकर अशा दिग्गजांपर्यंत Little champs ना सहज पोचता आलं. 'वसंतोत्सवा'सारख्या लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली, एखाद्या गाण्याची actual recording process कशी असते हे अनुभवायला मिळालं...NDA सारख्या ठिकाणी भेट दिल्यामुळे आपल्या देशासाठी लढणारे सैनिक कसे 'तयार' होतात हे बघायला मिळालं.

या 'सारेगमप' चे विशेष निमित्ताने सादर झालेले काही episodes तर खूपच लक्षात राहण्यासारखे होते. एक म्हणजे 'बालदिना'च्या दिवशी या little champs ना 'black & white'च्या काळातील नायक-नायिकांसारखी वेशभूषा करून त्यांना गाणी सादर करायला लावली होती तो episode. मग २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात आपले प्राण गमावणारया शहिदांना श्रद्धांजली म्हणून सादर झालेला episode आणि आत्ता 'प्रजासत्ताक दिनाच्या' निमित्ताने स्वत: ह्र्दयनाथ मंगेशकरांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकारलेला 'शूरा मी वंदिले' हा episode. या episode ला प्रेक्षकात 'विशेष अतिथी' म्हणून उपस्थित असलेल्या शहिदांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या कहाण्या ऐकताना अंगावर अक्षरश: शहारे उभे राहिले. या कार्यक्रमात त्यांना बोलावलं नसतं तर या कहाण्या कधी आपल्यापर्यंत पोचल्याच नसत्या.

या सारेगमप project चाच एक sub-project म्हणजे त्यांचा 'मस्ती की पाठशाला' हा कार्यक्रम. हा कार्यक्रम मला भन्नाट आवडायचा. Actual कार्यक्रमात शहाण्यासारख्या वागणारया या Little champs ची मजा-मस्ती-खोडया पाहताना लहानपण आठवायचं, एखाद्याला ठरवून बकरा केलेलं बघताना धम्माल यायची..Zee marathi च्या सगळ्या team चे हे Little champs लाडके होते आणि माझेही. एक एक जण eliminate झालेला बघताना त्यांच्याप्रमाणे माझ्याही डोळ्यात पाणी यायचं. शमिका भिडे आणि शाल्मली सुखटणकर या दोघी eliminate झाल्या तेव्हा जरा जास्तीच वाईट वाटलं. कारण 'शमिका'ची maturity आणि शाल्मली ची 'टिपरें'ची acting आवर्जून आवडायची. वाईट जरी वाटत असलं तरी शेवटी ही competition आहे हे सत्य मुलांना स्विकारता यायलाच हवं हेही वाटायचं. आपण elimiate झाल्याचा निकाल शमिका ने ज्या maturity ने स्विकारला त्यामुळे ती कायम लक्षात राहिल. एक जण eliminate झाला तर सगळ्यांच्या आया रडायच्या, एखाद्याच्या पालकांना एखाद दिवशी शुटिंगला यायला जमलं नाही तर दुसरयांच्या आया त्या मुलांची आपल्या स्वत:च्या मुलाप्रमाणेच काळजी घ्यायच्या. हे सगळं पाहिल्यावर एक नक्की जाणवायचं की या मुलांमधली competition ही अत्यंत healthy होती. आणि याच भावनेची आज नवीन पिढीला सगळ्यात जास्त गरज आहे.

No comments:

Post a Comment